मुंबई : आजकाल सोशल मीडिया वर कोणतीही पोस्ट आली, ती एवढी झपाट्याने वाढते की लगेचच व्हायरल होते, परांटी खरी असतेच असे नाही, तर हेच या व्हायरल विडीओ मागचे सत्य पडताळण्यासाठी आम्ही कार्यरत होतो, तर पाहूया या मागचं सत्य काय आहे? आ
ज अचानकपणे सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर दुचाकी वाहनांना या तारखेनंतर टोल द्यावा लागणार असे वृत्त दिल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र दुचाकी वाहनांना टोल आकारला जाणार हे कितपत खरं आहे याची माहिती आमच्या टीम ने घेतली असता असा निष्कर्ष समोर आला, आणि माहिती समोर आली आणि हे वृत्त एकदम खोटं आहे.

आम्ही NHAI हे स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. याबाबत आम्ही थेट नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI कडे याबाबत सत्यता तपासली असता असला कोणताही निर्णय त्यांनी घेतला नसल्याचे सांगण्यात आले याबाबत NHAI ने स्वतः माहिती प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, काही माध्यमे भारत सरकार दुचाकी वाहनांवर वापरकर्ता शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. तर आम्ही NHAI हे स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही. आणि जे वृत्त पसरवले जात आहे ते खोटं म्हणजे असत्य आहे.